आधार लिंक नसेल तर मिळणार नाही रेशन ….
१ फेब्रुवारीपासून रेशन बंद होणार, अशी अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली माहिती
मुंबई : रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार, अशी माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केले आहे. आतापर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचे आधार लिंक पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप तीन लाखांहून अधिक लाभार्थीचे आधार लिंकीग होणे बाकी आहे.
रेशन दुकानावर आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे. आधारकार्डावरुन तुमचे रेशन आधारसोबत लिंक केले जाणार आहे. यासाठी फिंगर प्रिंटदेखील स्कॅन केला जाणार आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचा मोबाईल नंबरदेखील द्यावा लागणार आहे. बोगस रेशन ओळखले जावेत, यासाठी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. ३१ जानेवारीपर्यंत आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. आधार लिंक न केल्यास १ फेब्रवारीनंतर रेशन दिले जाणार नाही.