मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार
नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उस्मानाबादेत
उस्मानाबाद : राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बुधवार, 21 ऑक्टोबर उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काटगावकडे रवाना झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल, सोलापूरहून उस्मानाबादेकडे रवाना परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. तसेच शेतीचे आणि पिकाचेही मोठे नुकसाचे झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी सोलापूरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मदतीचे चेक दिले होते. मात्र ही तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरघोस मदत द्या, अशी मागणी बळीराजा करत आहे.
मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा कसा असेल? सकाळी 9.30 वाजता – सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण., सकाळी 10.15 वाजता – काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी आणि शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी., सकाळी 10.30 वाजता – काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण., सकाळी 11.15 वाजता – अपसिंगा येथे आगमन आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी., सकाळी 11.35 वाजता – अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव., दुपारी 12.20 वाजता – पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा आणि अभ्यागतांच्या भेटी राखीव.